सुरजागड लोह प्रकल्प वाल्यांनी केली ट्रक धारक लाभार्थ्यांची फसवणूक, व्यथा लाभार्थ्याची- कथा सरकारची. एटापल्ली सर्कलमधील 22 सुशिक्षित बेरोजगारांना भव्य दिव्य कार्यक्रमात ट्रकच्या चाब्या मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते दिल्यात ,ट्रक मात्र गायब...

 संपादक
 मुनिश्वर बोरकर
 गडचिरोली.
9421734792



गडचिरोली - एटापल्ली तालुका परिसरातील २२ सुशिक्षीत बेरोजगार लाभार्थ्याना सुरजागड लोह प्रकल्पात शासनाकडून मिळणाऱ्या ट्रका सुरजागड लोह खनिजाची वाहतुक करण्याकरीता रोजगार देतो असे सुरजागड प्रकल्पाचे उपाध्यक्ष अतुल खांडीलकर यांनी सांगीतले. आदिवासींनी ट्रका मिळण्यासाठी अनामत रक्कम रुपये पन्नास हजार २२ लाभार्थ्यानी उसनवारी तर काहींनी बचत गटाकडून कर्ज काढून रुपये पन्नास हजार बॅक ऑफ इंडिया शाखा आलापल्ली येथे २२ लार्भात्यांनी शासनाच्या आदेशाप्रमाणे सन २०१९ ला भरणा केला.
त्यानुसार जिल्हाधिकारी कार्यालयातील भव्यदिव्यअश्या कार्यक्रमात मुंख्यमंत्री देवेंद्र फडणविस , सुरजागड प्रकल्पाचे उपाध्यक्ष अतुल खाडीलकर , आयुक्त संजिव कुमार जिल्हाधिकारी SP लोकप्रतिनिधी व असंख्य लोकांच्या प्रमुख उपस्थितीत ट्रकांचे वाटप कार्यक्रमात २२ लाभार्थ्यांना मुख्यमंत्र्याच्या हस्ते गाडीच्या चाब्या दिल्यात मात्र तत्बल पाच वर्ष लोटूनही ट्रकाचा पत्ता नाही त्यामुळे 22 लाभार्थ्याची शासनाने आदिवासी बांधवांची जनु फसवणुकच केली त्यामुळे लाभार्थी आता देशोधळीला लागले असुन लाभार्थी आपले गाव सोडून आता प्राणहिता आलापल्ली कार्यालया समोर झोपड्या बांधुन आहेत अशी हि व्यथा आहे लाभार्थ्यांची तर कथा आहे शासनाची.


सविस्तर वृत्त असे की एटापल्ली सर्कल मधील आदिवासी बांधवांना सुरजागड लोह प्रकल्प येथुन लोहा कच्चा माल वाहतुक करण्याकरीता कौशल्य विकास व स्वयंम रोजगार योजने अंतर्गत खनिज प्रतिष्ठान निधिमधुन अनुदान मंजुर करण्यासाठी लाभार्थीना सुरजागड खनीज प्रकल्प वाल्यानी अनामत रक्कम बॅकेत भरा तुम्हाला ट्रका मिळाल्यानंतर आम्ही तुमच्या ट्रका सुरजागड प्रकल्पात लावू असे आश्वासन दिले. त्यानुसार जवळपास २५ आदिवासी बांधवांनी कर्ज काढून महाराष्ट्र बॅक आलापल्ली येथे काशिनाथ सडमेक , निर्माला सडमेक , हरिदास मडावी , सैन्नु जोई ' बंडु दोरपेट्टी , सावजी वेलदा , बंडु वेलदा , रुपेश होळी , मधुकर पुंगाटी व इतर सहीत प्रत्येकी ५० हजार रुपये अनामत रक्कम भरली.
टूका देण्याचा कार्यक्रम जिल्हाधिकारी कार्यालय गडचिरोली येथे राज्याचे मुख्यमंत्री फडणविस व मान्यवरांच्या उपस्थितीत ट्रकाच्या चाब्या लाभार्थ्यांना दिल्यात मात्र ट्रकाचा पत्तास नाही. आजतागायत तिन वर्ष लोटूनही लाभार्थ्यांना ट्रका मिळाल्या नाही व अनामत रक्कम मात्र सुरजागड लोह खनीज प्रकल्पाने लाखो ट्रका आमदारांच्या लावल्या लाभार्थ्यांना मात्र ढेंगा दाखविला त्यामुळे हवालदिन झालेल्या लाभार्थ्यांनी आपले गाव सोडून आता प्राणहिता प्रकल्प आलापल्ली समोर आपल्या झोपड्या बांधुन उदरनिर्वाह करीत आहेत.
दि. २८ मे ला रिपब्लिकन पार्टीच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळ जिल्हाधिकारी यांना भेटून आपबिती सांगताच निवासी जिल्हाधिकारी यांनी तोंडावर बोट ठेवला. अश्या प्रकारची २२ लाभार्थ्यांची शासनाने व सुरजागड लोह खनिज प्रकल्पांनी फसवणुक केली.
सदर शिष्ठ मंडळात जिल्हाधिकारी यांना निवेदन देतांना रिपब्लिकन पार्टी चे जिल्हाध्यक्ष प्रा. मुनिश्वर बोरकर , रिपाई नेते गोपाल रायपूरे , रिपाईचे अहेरी विधानसभा प्रमुख शंकर अण्णा सेनिगारपु सिरोंचा , सामाजिक कार्यकर्ता सखाराम झोडे सर , रिपाईचे जिल्हा उपाध्यक्ष दशरथ साखरे , मारोती भैसारे , रिपाईचे विकास उंदिरवाडे , रिपाई शहर प्रमुख चोखोबा ढवळे , नाजुक भैसारे , लाभार्थ्या काशिनाथ शेडमाके ' घिसुजी मडावी , निर्मला सडमाके आदि उपस्थित होते .

0/Post a Comment/Comments