अखेर रामदास मसराम आमदार यांच्या प्रयत्नाने उन्हाळी धान खरेदी कालावधी व उद्दिष्टांमध्ये शासनाने केली वाढ..

गडचिरोली सुपरफास्ट 
न्यूज वृत्तसेवा
दिनेश रामाजी बनकर 
मुख्य संपादक 


आरमोरी - तालुक्यातील शेतकऱ्यांनी पावसाळी उत्पादनात घठ आल्याने नदि नाल्यांवर पंप बसवून व काही शेतकरी विहीवर तसेच ईटिया डोह प्रकल्पाच्या पाण्यानी उन्हाळी धान पिक मोठ्या घेतले परंतु आधारभूत धान खरेदी केंद्र उशिरा सुरू झाल्यामुळे बहुतेक शेतकऱ्यांनी घरी जागा नसल्यामुळे रस्तेवर झाकुन ठेवले काहीचे पावसाच्या पाण्यानी भिजलेही यात शेतकऱ्यांची नुकसान झाली याला समोर जाऊन काही दिवसानी मार्केटिंग फेडरेशन च्या वतीने आरमोरी खरेदी विक्री सहकारी संस्थांचे तसेच आदिवासी विकास महामंडळाच्या वतीने आदिवासी विविध कार्यकारी संस्थेचे केंद्र सुरू करण्यात आले यात शेतकऱ्यांनी घरी ठेवलेले धान विक्रीसाठी केंद्रावर मोठ्या प्रमाणात आणले असता खरेदीचा कालावधी दिनांक ३० जून २०२५ पर्यंत असल्यामुळे यात एकट्या आरमोरी केंद्रावर जवळपास नवशेच्यावर शेतकऱ्यांनी आरमोरी खरेदी विक्री संस्थेच्या केंद्रावर नोंदणी केली असता यातील चारशे शेतकऱ्यांच्या धानाची खरेदी




 झाली पण अजुन ही ११ दिवसा अजून जवळपास सहाशे शेतकरी धान विक्रीपासुन वंचित आहेत तसेच खरेदी कालावधी मध्ये ऑनलाईन पोर्टल वर अनेक तांत्रिक अडचणी येत असल्याने खरेदी केंद्रावर विक्री केलेल्या बऱ्याचशा शेतकऱ्यांचे धानाचे बिल बनविणे मुदतीच्या आत होऊ शकत नाही, ट्रक्टर्स च्या रांगाच रांगा आरमोरी खरेदी विक्री संस्थेच्या पळसगाव उपकेंद्र व आरमोरी बडी केद्रावर असून मुदतीचे आत धानाचा काटा होणे शक्य नाही तरी वरील अडचणी लक्षात घेता धान खरेदीचा कालावधी वाढवून मुदत वाढ देण्यात यावी.तसेच धान खरेदी चे किक्टलचे उद्दिष्ट कालच सरल्यामुळे आधारभूत धान खरेदी केंद्र बंद झाल्याने शेतकरी अडचणीत सापडला असल्यामुळे पंधरा दिवसांची मुदतवाढ व उद्दिष्ट वाढवुन देण्यासाठी पाठपुरावा करावा अशी मागणी आरमोरी तालुक्यातील उन्हाळी धान उत्पादक शेतकऱ्यांनी आमदार रामदास मसराम यांच्या कडे केली असता आमदार रामदास मसराम यांनी यांची दखल घेऊन स्वतः आमदार मसराम यांनी आरमोरी बडी येथील खरेदी विक्री संस्थेच्या केंद्राला स्वतः दि. २८ जुनला भेट देऊन शेतकऱ्यांच्या समस्या जाणल्या असता जागच्या जागी शेतकऱ्यांचे धान भरलेले ६० ते ७० ट्रॅक्टर पाण्यात भिजत होते काहीचे धान ट्रॅक्टर मधेच वापले दिसल्याने शेतकऱ्यांचे विक्री अभावी नुकसान होत असल्याने प्रशासना विरोधात रोष व्यक्त करुण आधारभूत उन्हाळी धान खरेदी केद्राना धान खरेदी मुदत व उद्दिष्ट वाढविण्याच्या मागणीसाठी आमदार रामदास मसराम विधानसभा अधिवेशनात प्रश्न उपस्थित केला तसेच अन्न व नागरी पुरवठा राज्य मंत्री योगेश कदम तसेच आदिवासी विकास मंत्री ऊईके यांच्यासोबत चर्चा केली यात गडचिरोली जिल्हा हा अतिदुर्गम, आदिवासीबहुल आणि नक्षलग्रस्त भाग असून येथे रब्बी हंगामात मोठ्या प्रमाणावर धान उत्पादन होते. मात्र यंदा हवामानातील अनियमितता आणि उशिराने आलेल्या पावसामुळे अनेक शेतकऱ्यांचे पीक उशिरा तयार झाले आहे. शेकडो शेतकरी परिणामी, मार्केटिंग फेडरेशन व आदिवासी विकास महामंडळामार्फत चालविण्यात येणाऱ्या धान खरेदी योजनेच्या निश्चित कालावधीत अनेक शेतकरी धान विक्रीस आणू शकलेले नाहीत.याशिवाय, खरेदीसाठी ठरविण्यात आलेले उद्दिष्ट अत्यल्प असल्याने अनेक पात्र शेतकरी योजनेच्या लाभापासून वंचित राहिले आहेत. या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांमध्ये प्रचंड नाराजी असून, त्यांना आर्थिक नुकसान सहन करावे लागत आहे.
या बाबींचा विचार करता आमदार मसराम यांनी मंत्री कदम यांच्याकडे पुढील चार प्रमुख मागण्या मांडल्या यात रब्बी हंगाम २०२४-२५ करिता धान खरेदीचा कालावधी किमान १५ दिवसांनी वाढवावा.
खरेदी उद्दिष्ट वाढवून अधिकाधिक शेतकऱ्यांचा समावेश करावा.खरेदी केंद्रांवरील सुविधा वाढवून धान साठवण व मोजणी प्रक्रियेत गती आणावी.
शेतकऱ्यांना लवकरात लवकर धानाचे पैसे अदा करण्यात यावेत.

या मागण्यांच्या अनुषंगाने अधिवेशनात तसेच मंत्री केंद्र सरकारच्या सहसचिव मा. श्रीमती सी. शिखा (भारत सरकार, नवी दिल्ली) तसेच राज्याचे अन्न व नागरी पुरवठा विभागाचे सचिव मा. श विकास राऊत यांच्याशी दूरध्वनीद्वारे चर्चा केली. यावेळी त्यांनी सदर प्रकरणात त्वरित आणि समाधानकारक कार्यवाही करण्याचे आवाहन मंत्री व अधिकाऱ्यांना केले.होते या सकारात्मकता दाखवत शेतकऱ्यांच्या अडचणी लक्षात घेता मुदतवाढ दिल्याने अखेर आमदार रामदास मसराम यांच्या प्रयत्नाने उन्हाळी धान खरेदी कालावधी व उद्दिष्टात वाढीचे आदेश काल निघल्याने आमदार मसराम यांच्या प्रयत्नाला यश आले असल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळाला असुन शेतकऱ्यांनी मानलें आमदार मसराम यांचे आभार. मानले आहे.

0/Post a Comment/Comments