गडचिरोली सुपरफास्ट
न्यूज वृत्तसेवा
प्रा. मुनीश्वर बोरकर
संपादक गडचिरोली
गडचिरोली - राष्ट्रीय किसान मोर्चा व रिपाईच्या वतीने शेतकऱ्यांचा समस्या न सोडविणाऱ्या आमदारांच्या कार्यालयापर्यत भोजराज कानेकर , प्रा. मुनिश्वर बोरकर यांच्या नेतृत्वात मोर्चा काढण्यात आला.
मागण्याचे निवेदन आमदार मिलिंद नरोटे यांना शेतकऱ्याच्या मार्फतीने देण्यात आले. शेतकऱ्यांना हमीभाव मिळाला पाहिजे , शेतकऱ्यांचे विघ्युत
बिल माफ करावे , हमी भावाची रक्कम पेरणीपूर्वी मिळाली पाहीजे. शेतकऱ्यांना पि. एम. विमा योजना ऐवजी इरमा कायदा लागु करण्यात यावा , खाजगी पिकविमा कंपण्या बंद करण्यात याव्यात , जंगली प्राणी यांच्यापासून पिक व मनुष्यहानी ची नुकसान भरपाई देण्यात यावी अश्या विविध मागण्याचे निवेदन धेराव आंदोलनामार्फत देण्यात आले.
सदर मोर्च्यात बामसेफ चे भोजराज कानेकर ,
आरपीआय चे नेते प्रा. मुनिश्वर बोरकर , रिपाईचे गोपाल रायपूरे , संजय गंडाटे , जयंत गेडाम , प्रमोद राऊत , दामोधर शेन्डे ' चोखोबा ढवळे , खेमदेव हस्ते , लवकुश भैसारे , हेमंत बारसागडे , रोहिदास डोंगरे , उमेश ढोक , नरेद्र शेंडे , प्रेमदास रामटेके ,शेमदेव हस्ते ,लवकुश भैसारे 'जगदिश मेश्राम , नागेश कुमारे ' संजय कंडलवार , लता भैसारे , संघमित्रा राजवाडे , सुरेश मेश्राम , श्रावण मेश्राम , नेताजी मेश्राम , सुनंदा
बांबोळकर , कविता ढोक , सुहानी मेश्राम , मिना मेश्राम , रशिका चुनारकर , डोमाजी गेडाम , सुनिता कुंभारे , जगदिश मेश्राम , प्रेमलता कानेकर , धनिलाल कंडेलवार , समय्या जगनाथ ' आदि सहीत पाचसे शेतकऱ्यांच्या उपस्थितीत आमदारांना घेराव करून निवेदन देऊन चर्चा करण्यात आली. शेतकऱ्यांच्या समस्या पावसाळी अधिवेशनात माडण्याचे आश्वासन दिले. घेराव आंदोलन जिल्ह्यातील तिनही आमदारांना निवेदन देण्यात आले. त्यापैकी आरमोरीचे कांग्रेसचे आमदार रामदास मसराम व अहेरी विधानसभेचे आमदार बाबा आत्राम यांना पूर्व सुचना देऊनही गैरहजर होते.
शेतकऱ्यांच्या समस्या न सोडविल्यास १ जुलैला भारतबंद करण्यात येइल अशा ईशारा राष्ट्रीय किसान मोर्चा - रिपाई यांच्या वतीने देण्यात आला.
Post a Comment