गडचिरोली सुपरफास्ट
न्यूज वृत्तसेवा
गडचिरोली ब्युरो
गडचिरोली - तथागत बुद्धाने जगाला शांतीचा मार्ग दाखविला. त्या मार्गाने सारा देश चालला असता तर आज युध्दाची पाळी आली नसती. म्हणुन आज साऱ्या जगाला वाटते की युद्ध नको बुद्ध हवे असे विचार रिपाईचे जिल्हाध्यक्ष प्रा. मुनिश्वर बोरकर यांनी सालईटोला येथील बुद्ध विहारात बुद्ध जयंती प्रसंगी माडले.
सालईटोला (खरपुंडी) येथील बुद्ध विहारात पार पडलेल्या बुद्ध जयंतीच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष रिपाई नेते प्रा. मुनिश्वर बोरकर हे होते. तर कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक बामसेफ चे जिल्हाध्यक्ष भोजराज कानेकर , मंडळाचे अध्यक्ष श्रावण शेंडे , हेमंत बारसागडे आदि लाभले होते.
याप्रंसगी भोजराज कानेकर म्हणाले की , धम्मविराशत वाचविणे हि काळाची गरज आहे. त्यासाठी प्रत्येकांनी घराबाहेर निघुन आपल्या अस्तित्वाची लढाई लढलो तरच धम्मविराशत वाचेल अन्यता गुलामगिरीतच राहावे लागेल. यासाठी बौद्धगया महाबोधी महाविहार वाचविण्यासाठी संघर्ष करावा लागेल त्यासाठी सर्वांची एकजुट करून संघर्ष करण्याची तयारी ठेवावी अश्या प्रकारचे मोलाचे मार्गदर्शन कानेकर सरांनी केले.
कार्यक्रमाचे संचलन अनमोल डोंगरे तर आभार विजय रामटेके यांनी मानले. कार्यक्रमास देवानंद सेमस्कर
' मनोज खोब्रागडे , नलिना सेमस्कर , श्रावण मेश्राम , निलकंठ अलोणे , अरुण मेश्राम , बंडू आलोणे ,वनिता डोंगरे , मालाबाई बारसागडे , मालाबाई बोरकर , श्रृती घुटके , सोनाली बारसागडे ,आदि सहीत बहुसंख्य उपाषक उपाषिका प्रामुख्याने उपस्थित होते.
Post a Comment