डॉक्टर नामदेव कीरसान यांचे विजयासाठी डॉक्टर आंबेडकरांचे संविधान फावले... विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार ठरले किंगमेकर....

.
गडचिरोली
मुनिश्वर बोरकर
संपादक
गडचिरोली _ तब्बल दहा वर्षांनंतर कांग्रेसचे चिमुर लोकसभा निवडणुकीचे उमेदवार डॉ. नामदेव किरसान यांनी बाजी मारली असून भाजपाचे अशोक नेते पराभुत झालेत. डॉ. बाबासाहेब आंबेडकराचे संविधान चिमुर लोकसभा निवडणुकीत केंद्रस्थानी ठेवल्यामुळे भाजपा संविधान संपविणार ह्या भितीपोटी डॉ. नामदेव किरसान यांना चिमुर लोकसभा निर्वाचन क्षेत्रातील सर्व अनुसुचित जातीच्या मतदारांनी सर्वातोपरी सहकार्य केल्यामुळे व गेल्या दोन वर्षातील नाटक , दंडारी ' गृहप्रवेश , वाढदिवश व लग्न कार्यात डॉ. नामदेव किरसान यांची उपस्थिती व दौरा सुद्धा डॉ. किरसान यांना फायदेशिर ठरला सोबतच कांग्रेसचे विरोधी पक्ष नेते विजयभाऊ वडेट्टिवार यांचा प्रचार दौरा , सभा निर्णयात्मक ठरला.सन २०१९ च्या लोकसभा



 निवडणुकीत वंचितने सव्वा लाख मते घेतली होती त्यामुळे कांग्रेसच्या उमेदवारांचा पराभव झाला होता. २०२४ च्या निवडणुकीत वंचित १६ हजारावरच थांबली म्हणजेच चिमुर लोकसभा क्षेत्रातील ६ विधान सभेतील तमाम बौद्ध बांधवानी वंचितच्या प्रकाश आंबेडकर यांच्या पक्षाला व आंबेडकर घराण्याला न जुमानता कांग्रेसच्या उमेदवारांना सहकार्य केले. बसपाचे १९ हजार मते हे नेहमीचीच ठराविक मते आहेत . परंतू वंचित फॉक्टर न चालल्यामुळे डॉ. किरसान हे भरघोष मतानी विजयी झालेत त्यांना ६ , १७ . ७९२ मते मिळाली तर भाजपाचे अशोक नेते यांना ४ , ७६ , ० ९६ मते मिळाली डॉ. किरसान हे १ लाख ४१ हजार मताची आघाडी घेऊन विजयी झालेत. भाजपाचे अशोक नेते गेल्या दहा वर्षात जनसंपर्क व विकासाची कामे न करताच ते आपल्याच तोऱ्यात राहीले यात बिजेपी व RSS चे प्रमुख अशोक नेतेवर नाराज होते. सोबतच वंचितची या निवडणुकीत पिछेहाट झाल्यामुळे अशोक नेते यांना पराभव पत्कारावा लागला . कांग्रेस कडे RPI च्या नेत्यांना अजुनही भाव नाही - कांग्रेसचे डॉ. आंबेडकराचे संविधान भाजपा बदलविणार केवळ आणि केवळ संविधान निवडणुकीच्या प्रचारात केंद्रस्थानी ठेवल्यामुळे गावोगावच्या बौद्ध बांधवांनी कांग्रेसला डोक्यावर घेतले तेही जिल्हातील RPI च्या नेत्यांना विचारपुस करूनच परंतु आजही कांग्रेस वाल्यांकडून RPI नेत्यांना डावलण्याचे धोरण सुरूच आहे . असे खाजगित RPI चे जिल्ह्यातील नेते बोलतांना दिसतात . RPI नेत्याचा वापर केवळ निवडणुकीत केल्या जातो कि काय ? हि पुर्वीपासून ची निती कांग्रेसने बदलविण्याची गरज आहे.
'

0/Post a Comment/Comments